मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान.!
*25 वर्ष अविरत सेवेची पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची राज्य शासनाकडून दखल.!*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यभरातून तानाजी कांबळे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव.!*
&&&&-&
*सिंधुदुर्ग | जनिकुमार कांबळे*
केंद्रीय शिक्षक | भारतीय बौद्ध महासभा | कवी गायक भीम शाहीर
&&&&&
समाजाच्या विकासासाठी, न्याया करिता, उत्थानाकरिता ज्या व्यक्ती काम करतात.स्वतःचा नाही तर आपल्या पलीकडचा विचार करतात.समाजाचा मी देणं लागतो म्हणून मला करायचं आहे.अशा निस्पृह भावनेने कार्य करतात अशा व्यक्तींच्या पाठीशी सरकार नेहमीच उभे राहते.भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराच्या इतिहासात हा सर्वात देखना पुरस्कार सोहळा आहे.असे सांगतानाच समाजामध्ये सर्वात मोठी विडंबना जर काय असेल तर समाजात आपण चांगल्याला चांगलं म्हणत नाही. आणि वाईटाला वाईट म्हणत नाही. आपण चांगल्याच्या पाठीशी उभे राहणार नाही.तोपर्यंत चांगल्या चा पुरस्कार होणार नाही.आणि वाईटाचा तिरस्कार होणार नाही. आपण जे चांगलं कार्य केलं आहे. त्या कार्याची आम्ही दखल घेतली आहे.आपण केलेल्या कार्याची कृतज्ञता आम्ही पुरस्काराच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने, मंगळवार 10 जून 2025 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट मुंबई, येथे आयोजित केलेल्या विविध पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बोलत होते.
मागील पंचवीस वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रधान करण्यात
आला.सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ, सन्मान पत्र आणि रुपये 75,000 चा धनादेश देवून सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे आणि त्यांची पत्नी आरती कांबळे यांना सन्मान पूर्वक गौरविण्यात आले.यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले,जलसंधारण मंत्री संजय राठोड,आमदार संजय बांगर,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त प्रवीण पुरी आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजयजी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली या दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस बोलत होते.
आपल्या भाषणात देवेंद्रजी फडणवीस पुढे म्हणाले भारतीय संविधान जे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलं असं संविधान जगात सर्वोत्कृष्ट संविधान ठरलं आहे. ज्या संविधानाने मानवतेचा, समतेचा, बंधुत्वाचा, संदेश दिलेला आहे. संविधानाने या देशाला सर्वाना सोबत घेऊन जाण्याचा संदेश दिला आहे. संविधानात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संधीची समानता तयार केलेली आहे.
देशाचे प्रधानमंत्री ना. नरेंद्रजी मोदी यांनी ज्यावेळी शपथ घेतली तेव्हा त्यांनी संविधानाचे दर्शन घेतले. त्यावेळचे त्यांचे वाक्य महत्त्वाचे आहे.ते म्हणाले मला गीता, बायबल, कुराणा पेक्षाही भारतीय संविधान महत्त्वाचे वाटते. याच संविधानाच्या माध्यमातून प्रगती होणार आहे. आणि शेवटच्या माणसाला न्याय देता येणार आहे.ना. नामदार देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आपल्या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घरोघरी संविधान हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. ही उद्देशिका आपण अंगीकारली तर देशातील 90% अडचणी दूर होतील. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक अंतिम टप्प्यात आहे.असेही देवेंद्रजी फडणवीस म्हणाले.
*उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे*
समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका पार पडली आहे.ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. या पुरस्काराने शासनाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली असून सामाजिक न्यायासाठी लढणा-या प्रत्येकाचे अभिनंदन.! ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनी पुरस्कारासाठी काम केलेले नसते. स्वतःसाठी तर सगळे जगतात पण दुसऱ्याच दुःख वाटून घेण्याचं काम जे करतात, त्यांनाच पुरस्कार मिळतात. समाजामध्ये काम करताना खूप सोसावे लागते,घाव सहन करावे लागतात, कष्ट उपसावे लागतात तेव्हाच पुरस्कार मिळतात असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी केले.
सन्मान कार्याचा गौरव महाराष्ट्राचा हे केवळ बोधवाक्य नाही तर राज्य शासनाची सामाजिक बांधिलकीची या निमित्ताने प्रचिती आहे. शासन आणि प्रशासन सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी कायम उभे आहे असे ही नामदार एकनाथजी शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले पुरस्कार मिळाला त्यांची जबाबदारी वाढली आहे. आणि कर्तव्याची जाणीव देखील त्यांना पुरस्काराच्या माध्यमातून होणार आहे.इतरांना देखील चांगलं काम करण्याची या निमित्ताने प्रेरणा मिळेल. हा आपल्या व्यवस्थेचा गौरव आहे. शासन आणि प्रशासन सामाजिक न्यायासाठी जगणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी कायम उभे आहे. पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्यांचे कौतुक होते. तसेच महामानवांचे स्मरणही होते. चांगल्या कार्याचा गौरव झाल्यास समाजात सकारात्मक प्रेरणा मिळते. महामानवांच्या कार्याचा आदर्श ठेवूनच समाजातील बांधवांनी कार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तानसेन भाई ननावरे, निलेश गजरे,जयवंत तांबे,ॲड.संदीप जाधव,विजय वेदपाठक,डॉ.निखिल आठवले,राज नागवेकर, समाजभूषण शांतु डोळस, समाजभूषण सो.ना.कांबळे, समाजभूषण राजू झनके,रतन आस्वारे, विश्वास पाटील, पत्रकार गणेश खेडेकर,विलास जाधव,श्याम वाडकर,शलाका जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुरस्कार वितरण सोहळा संपल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..
*चैत्यभूमीवर जाऊन समाजभूषण तानाजी कांबळे यांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.!*
राज्य शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांनी पवित्र चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
चैत्यभूमीचे पुज्य भन्तेजी,तसेच चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे,निलेशा साळवी,राज नागवेकर अंकुशराव हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. चैत्यभूमीवर यावेळी समाजभूषण तानाजी कांबळे यांचे चिरंजीव वैभव, सुनबाई वैशाली आणि अभिषेक यांनी उपस्थित ना पेढे वाटून आनंद साजरा केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल,ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांची प्रतिक्रिया
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा राज्यसरकारने मला समाजभूषण पुरस्कार प्रदान केल्याने मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे.
पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
*पण... तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे* या जिद्दीने, आणि स्फूर्तीने मी निस्वार्थ भावनेने काम करीत राहिलो. माझ्या कठोर परिश्रमाची, योगदानाची,समर्पणाची राज्य सरकारने दखल घेतली. मी माय,बाप सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो.
पुरस्काराचा हा सोनेरी क्षण मी कृतज्ञतेच्या भावनेने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवणार आहे.
तानाजी कांबळे हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ज्यांनी ज्यानी मला विविध माध्यमातून संपर्क साधून शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले त्या सर्वाचे मनःपूर्वक आभार.!
माझ्या आजवरच्या प्रवासात मला ज्यांचे मार्गदर्शन,प्रेम खंबीर पाठिंबा आणि साथ मिळाली त्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. माझे आई-वडील. आणि प्राचार्य मुकुंदराव कदम सर यांचेही या निमित्ताने मी स्मरण करतो.
आपलाच
*तानाजी अनुसया शांताराम कांबळे*
7507966260
0 Comments