संतोष देशमुख हत्याकांड
जाती पातीचे राजकारण
बीड मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या चर्चेने रान पेटले आहे देशमुख सरपंचांची अत्यंत क्रूर, अमानुष, अमानवी, राक्षसी पद्धतीने हत्या केली आहे जिचा निषेध सर्वांनी केला आहे आका धनंजय मुंढे, आकाचे काका, काकाची लेक आदी सर्वांनी ह्या अमानुष हत्येचा धिक्कार करून गुन्हेगारांना फाशीची मागणी केली आहे
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सुरेश धस सभागृहात ढसा ढसा रडले ज्या पद्धतीने सरपंच देशमुख यांचे अपहरण करून मारहाण, त्याच्या छातीवर नाचले, बरगडीची हाडे सरपंचच्या हृदयात घुसली हैवानीपनाचा कळस म्हणजे पानी पानी याचना करणाऱ्या सरपंचच्या तोंडावर हरामखोरांनी लघवी केली सुरेश धस कथनं करताना, रडत असताना कुणी फारसे लक्ष दिले नाही कारण मराठ्यांची बाजू घेऊन ओबीसी वंजारी विरोधात जातीयवाद, संघर्ष पेटविण्याचे काम काकांच्या दिग्दर्षांनाखाली मनोज जारंगे इमाने इतबारे करीत असताना भाजपचा आमदार सुरेश धस मराठ्यासाठी लढत आहे मनोज जारंगे यांचे पुढारपण धोक्यात येईल ह्या भीतीने जितेंद्र आव्हाड देखिल बुचकळ्यात पडले
बीड पोलिसांनी चार्जशीट कोर्टात दाखल केले त्यात सरपंच देशमुख यांची हत्या होत असताना आरोपीनी काढलेले 90 फोटो जोडले आहे चार्जशीट दाखल झाल्या नंतर मुंढे्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला व चार्जशीट मधील फोटो व्हायरल झाले फोटो बघून उभा महाराष्ट्र हादरला, जितेंद्र आव्हाड वेडा पिसा झाला मुब्रा मतदार संघातून भलामोठा दगड घेऊन विधान भवनाच्या गेटवर आला दगड स्वतःच्या डोक्यात घालून घेणार होता का धनंजय मुंढेच्या डोक्यात घालणार होता अजून उलगडा झालेला नाही कारण आव्हाड आपल्याच हाताने स्वतःचे हातात बेड्या घालून आले होते रडून रडून आव्हाडांचे डोळे लालबुंद व सुजलेले होते अन्यथा आव्हाड नवटंकी करीत आहे असे वाटले असत परंतु आव्हाड खरोखरच खूप दुःखी कष्टी झाल्याचे जाणवत होते कारण आव्हाड ओरडून ओरडून बोंबलत होते मीं जातीने वंजारी आहे देशमुखचे मारेकरी सर्वं वंजारी आहे पण मीं मराठ्यांच्या बाजूने लढत आहे जातीशी गद्दारी केली आणि श्रेय धस घेऊन गेले
आव्हाड, शरद पवार, सुप्रियासुळे व महाराष्ट्रातील तमाम राजकारणी, सत्ताधारी, उजवे दावे प्रतिगामी, साहित्यिक, पत्रकार लेखक विचारवंत, दमानिया सारख्या चळवळ्या यांना एक प्रश्न विचारतोय
खैरलांजी हत्याकांड, बल्लात्काराचे, मायलेकीची नग्न धिंड, बैलगाडीतील मृत शरीर हीं सर्वं फोटो प्रसार माध्यमातून, समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली, व्हायरल झाली तेंव्हा आव्हाड, शरद पवार, सुरेश धस, दमानिया बाई एकाही हरामखोराने हरामखोरणीने ब्र शब्द काढला नाही, कुणाच्याही डोळ्यातून पानी आले नाही हळहळ व्यक्त केली नाही
मुख्यमंत्री विलासराव देशमुखयांच्या मंत्री मंडळात गृहमंत्री आर आर पाटील होते ह्या आर आर पाटलाने खैरलांजी हत्याकांड दडपण्याचे पाप केले गुन्हा दाखल करण्यास विलंब टाळाटाळ केली, ऍट्रॉसिटी, बल्लात्काराचे कलम लावले नाही, बल्लात्कार झाला किंवा नाही वैदकीय तपास झालाच नाही
आर आर पाटील याने खैरलांजी गावाला तंटामुक्त गाव 'किताब देऊन सन्मानित केले
आज त्याचं राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचे चेले चपाटे गळे काढीत आहे
अन्याय, अत्याचार, बलात्कार करणारा मराठा असला की शेपूट घालून बसतात
अत्याचार, अन्याय झालेला मराठा असला की पेटून उठतात
कोपर्डीत अत्याचार झालेली चिमुरडी मराठा होती तर गुन्हेगार आरोपी दलित बौद्ध होता तेंव्हा ऐतिहासिक मराठे मोर्चे निघाले मनोज जारंगे हा महापुरुष कोपर्डी आंदोलनातून जन्माला आला आहे
शिर्डीच्या आकाश शेजवळ चे मारेकरी मराठा सर्वं राजरोस सुटतात
बीड - परभणी हत्याकांड एकाच काळात घडले ह्यातील दोन्ही हत्याकांडातील दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत होती मराठा असलेल्या सरपंच देशमुख साठी जीवाचे रान करणारे सत्ताधारी धस विरोधी पक्षाचे आव्हाड वट्टेडीवार मात्र सोमनाथ सूर्यवंशी बाबत मूग गिळून बसले असल्याचे दिसत आहे
धस महाशय्याने सोमनाथ सूर्यवंशी याचे मारेकरी पोलीस अधिकाऱ्यांना क्षमा करण्यात यावे असे जाहीर आवाहन केले होते जो न्याय संतोष देशमुख यांना तोच न्याय सोमनाथ सूर्यवंशी यांना नको का असा रास्त सवाल केला जात आहे
हत्याकांडात जाती पातीचे राजकारण सर्वच पक्ष करीत आहे
सुरेश धस मेघना बोर्डीकर यांच्या प्रचंड अपयशा नंतर सोमनाथ सूर्यवंशी वाकोडे न्याय लढा काँग्रेस पार्टीने हायजॅक केला आहे
युनायटेड रिपब्लिकन पार्टी
0 Comments